Petition updateEnlist Forts of Maharashtra as UNESCO World Heritage Sitesमहाराष्ट्रातले किल्ले युनेस्को यादीत येण्यासाठी प्रयत्न
Aanand KhardeMumbai, India
Apr 7, 2015
किल्लेही उतरणार स्पर्धेत Apr 7, 2015, म. टा. प्रतिनिधी, पुणे सह्याद्रीतील जैवविविधतेला 'वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जा मिळाल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेही आता या स्पर्धेत उतरणार आहेत. किल्ल्यांच्या माहितीचा प्रस्ताव जागतिक पातळीवर ताकदीने मांडण्यासाठी प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. राजस्थानाच्या किल्ल्यांच्या धर्तीवर सह्याद्रीतील किल्ल्यांना मानांकन मिळवून देण्यासाठी युनेस्कोचे माजी संचालक राजेंद्र शेंडे यासाठी पाठपुरावा करणार आहेत. जगभरात सध्या एक हजारांहून अधिक 'वर्ल्ड हेरिटेज साइट' आहेत. त्यातील भारतात ३२ ठिकाणे असून महाराष्ट्रामध्ये केवळ चारच ठिकाणांना हे मानांकन मिळाले आहे. सह्याद्रीतील सर्वाधिक संवेदशील ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारासह पश्चिम घाटाला दोन वर्षांपूर्वी 'वर्ल्ड हेरिटेज साइट'चे मानांकन मिळाले; पण सहा राज्यांमध्ये विभागलेल्या या घाटात महाराष्ट्रातील केवळ दोनच ठिकाणांची यासाठी निवड झाली. या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांना जगातील अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने टेर पॉलिसी सेंटरचे चेअरमन आणि युनेस्कोचे माजी संचालक राजेंद्र शेंडे आणि दुर्गप्रेमी आनंद खर्डे यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भातील पुढील दिशा ठरविण्यासाठी टेर पॉलिसी सेंटरच्या कार्यालयात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यामध्ये शेंडे, खर्डे, संस्थेच्या प्रमुख विनिता आपटे आणि दुर्गप्रेमी उपस्थित होते. युनेस्कोच्या हेरिटेज कमिटी समोर कोणताही प्रस्ताव मांडण्यापूर्वी तो पहिल्यांदा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जातो आणि मग सरकारमार्फत तो कमिटीसमोर येतो. हा अहवाल अचूक, नेमकेपणाने आणि सर्वंकष माहिती देणारा असणे आ‍वश्यक आहे. त्यामुळे आम्ही पहिल्या टप्प्यात या किल्ल्यांची सखोल आणि अधिकृत माहिती गोळा करणार आहोत. यासाठी दुर्ग संवर्धनामध्ये सक्रीय असलेल्या संस्था, अभ्यासक आणि तज्ज्ञांबरोबर आम्ही संवाद साधणार आहोत. या संदर्भात बैठकाही घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुकांनी ९८२२०९१५३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आपटे यांनी केले. ...... सह्याद्रीतील किल्ल्यांबरोबर प्रत्येक मराठी माणसाचे भावनिक नाते जुळलेले आहे. हे किल्ले केवळ ऐतिहासिक वारसा नसून प्रत्येक किल्ल्यातील वास्तूरचना, इंजिनीअरिंग हा संशोधनाचा विषय आहे. सह्याद्रीतील निसर्गाच्या कुशीत लपलेल्या या वास्तूंचे सवंर्धन आणि संरक्षण करावे, अधिकाधिक लोकांनी या किल्ल्यांवर भटकंती करावी, या उद्देशाने आम्ही त्यांना जागतिक सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. - राजेंद्र शेंडे, माजी संचालक, युनेस्को ‪#‎MaharashtraForts4UNESCOsites‬
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X