Petition updateSAVE THE Fertile Soil ............LAND ON THE PLANET.तप्त वसुंधरा…
Arvind AutadayMumbai, India
May 2, 2017
aतिक्रमणामुळे पृथ्वीच्या वातावरणात बदल घडून येतोय्. परिणामी पृथ्वीचं तापमान कमालीचं वाढतंय्. पृथ्वीच्या पर्यावरणातील हा बदल धृवीय प्रदेशात, समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीत तसेच पर्यावरणाच्या सातत्यानं वाढत्या तापमानात प्रकर्षाने दिसून येतोय्… जागतिक वातावरण संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात पृथ्वीच्या वातावरणाच्या वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलीय्… या अहवालानुसार २०१६ हे मागील वर्ष आजवरच्या आकडेवारीनुसार यंदाचं वर्ष मागील वातावरणाच्या वाढत्या तापमानासंबंधीचे सर्व उच्चांक मागे टाकण्याची लक्षणं स्पष्ट दिसताहेत… सततच्या वाढत्या तापमानामुळे वसुंधरा होतेय् तप्त… आपल्या भारताबाबत विचार केला तर गेल्या वर्षी उन्हाळ्यात १९ मे रोजी उत्तर राजस्थानातील फालोडी या गावात ५१ अंश सेंटीग्रेड इतकं विक्रमी तापमान नोंदण्यात आलं… भारतात यापूर्वी १९५६ साली नोंदलेल्या सर्वाधिक तापमानापेक्षा हे तापमान ०.४ अंश सेंटीग्रेडने जास्त होतं. भारतीय उपखंडात उन्हाळ्यात विशेषतः मान्सूनपूर्व कालावधीत मे व जून महिन्यात तापमान अधिक आढळून येतं. पण या वर्षी मार्चच्या उत्तरार्धापासूनच जवळपास संपूर्ण भारतात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येतेय. आपला महाराष्ट्रसुद्धा या वातावरणबदलास अपवाद नाही. उलटपक्षी यंदा महाराष्ट्र उष्णतेच्या झळांनी अधिकच होरपळून निघतोय. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील भिरा या गावी ४६.५ अंश सेंटीग्रेड इतकं प्रचंड तापमान नोंदवलं गेलं. हे तापमान त्यादिवशी पृथ्वीवर नोंद झालेलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान ठरलं. विदर्भ, मराठवाडा, खानदेश एवढंच नाही तर कोकणातही तापमानाचा पारा अधिक नोंदला जातोय. तसेच संपूर्ण भारतात विशेषतः मध्यप्रदेश, गुजरात तसेच राजस्थानात कमालीचा उष्मा जाणवतोय. जागतिक वातावरण संघटनेच्या अहवालानुसार यंदा वातावरणातील कार्बनडायॉक्साईड वायूचं प्रमाण सर्वाधिक आढळून आलं… ‘नासा’ या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था, जागतिक सागरी वातावरण व्यवस्थापन संघटना व ब्रिटिश हवामान खात्याद्वारे संयुक्तपणे सादर केलेल्या अहवालात पृथ्वीवरील वातावरणातील बदलांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आलीय. या अहवालानुसार २०१६ साली पृथ्वीच्या वातावरणाचं सरासरी तापमान औद्योगिकरण कालावधी पूर्वीच्या तापमानापेक्षा १.१ अंश सेंटीग्रेडने अधिक नोंदण्यात आलं. धृवीय प्रदेशातील बर्फाच्छादित प्रदेशात ४ दशलक्ष चौरस किमीची प्रचंड घट झाल्याचं आढळून आलंय. जागतिक स्तरावर सागरी पातळीत सर्वाधिक वाढ आढळून आली. या साऱ्याच्या परिणामी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पूर व दुष्काळांचा सामना करावा लागला… धृवीय प्रदेश, विशेषतः आर्टिक प्रदेशातील वाढत्या तापमानामुळे जगभर उष्णतेची लाट दिसून येतेय्… वातावरणातील वाढतं तापमान सागरात शोषलं गेल्यामुळे समुद्री तापमानात प्रचंड होते व त्याचा परिणाम उष्णतेची लाट येण्यात परिवर्तित होतो… या वर्षी अमेरिकेत ११००० ठिकाणी आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय्… जागतिक स्तरावर वाढत्या तापमानाचा संबंध एल निनो परिणामाशीही जोडण्यात येतो… आपल्या देशाबाबत विचार करायचा झाल्यास वाढत्या तापमानास वातावरणातील प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते… भारतीय उपखंडातील वाढत्या तापमानाबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून १९५० ते २०१० या ६० वर्षांच्या कालावधीतील वाढत्या तापमानाचा आढावा सादर करण्यात आलाय्… या कालावधीतील उष्णतेच्या लाटांसंबंधी आकडेवारीवर नजर टाकल्यास दरवर्षी सरासरी सहा ते आठ दिवस प्रचंड उष्णतेची लाट आढळून येते… पण जागतिक वातावरण संघटनेच्या अहवालानुसार येत्या कालावधीत तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय् त्यामुळे भारतासह जागतिक स्तरावर तापमानवाढीचा परिणाम जाणविणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय्… जागतिक स्तरावर वातावरण बदलाचा मुकाबला करण्यासाठी व वाढत्या तापमानास आळा घालण्यासाठी वातावरण बदलासंबंधीच्या ‘पॅरिस करारा’चं काटेकोर पालन करायला हवं तप्त वसुंधरा शांत करण्यासाठी…
Copy link
WhatsApp
Facebook
Nextdoor
Email
X