Mise à jour sur la pétitionSAVE THE Fertile Soil ............LAND ON THE PLANET.पर्यावरणाचं रक्षण करणार कोण ?

Arvind AutadayMumbai, Inde
2 mai 2017
आपल्या भारतात खाल्लेल्या चॉकलेटचा कागद रस्त्यावर टाकण्याची आपल्याला पूर्ण मुभा आहे. तंबाखू खाणाऱ्यांना ‘हे विश्वची माझे घर’ या वैश्विक सिद्धांताप्रमाणे कोणत्याही महापुरुषाच्या नावाने मिरवल्या जाणाऱ्या रस्त्यावर थुंकण्याची मुभा आहे. घरातला कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरून खिडकीतून भिरकवण्याची आमची परंपरा आहे. आपल्या पूर्वजांच्या मालकीची नदी आहे किंवा त्यांनीच धरण बांधलं आहे या आविर्भावात घरातल्या प्रत्येक बाथरूमध्ये पाण्याचा झरा वाहत असतो. वीज ही विश्वाने दिलेली देणगी असून तिचा अमर्याद वापर हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती कितीही वाढल्या तरी वाहनांची वाढती संख्या हे प्रगतीचं लक्षण आहे. त्यामुळे आपण आर्थिक सुबत्तेतून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहोत असे आभासी जीवन आपण जगतो आहोत.
आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की हे सांगायची गरज काय, कितीही बदल करायचा ठरवला तरी सगळे तसे वागतात कुठे, रस्त्यावर पडणारा कचरा शासनाने उचलायला नको का, स्वच्छता ही शासनाची सामाजिक जबाबदारी नव्हे का, प्रत्येक घरात दिवसरात्र वीज, पाणी आम्हाला मिळायला नको का, अशा आविर्भावात आपण नागरिक आपले सामाजिक भान विसरत चाललो आहोत. मुंबईहून परदेशात गेलेला माणूस इथे आल्यावर इतक्या बाता मारतो आणि म्हणतो आपण खूप मागे आहोत. अर्थात त्याने दिलेली प्रतिक्रिया शंभर टक्के खरी असते कारण प्रथम मीच मागे आहे, याची जाणीव मात्र त्याच्या लेखी नसते.
१९६० च्या दशकात सिंगापूरसारखा देश एकूणच कमालीचा मागे होता, १९४५ मध्ये उद्धवस्त झालेला जपान किंवा जर्मनी आज आपल्यापेक्षा कित्येक शतकं पुढे आहे. अत्यंत विषम हवामानाशी, तुटपुंज्या पावसाशी दोस्ती करत इस्रायल कृषी जगतात क्रांती करतो. ब्राझीलसारखा चिमुकला देश साखर उत्पादनात आघाडी घेतोय आणि आपण या सुरस कथा ऐकत कचऱ्यापासून ते अमर्याद पाण्याच्या वापरापर्यंत कोणताही बदल करत नाही.
Get 100 lifestyle amenities in a single place
Ad: Gm Infinite
Hairloss? Treat from Scalp & Regrow your Natural Hair Back!
Ad: Dr Batra's
Recommended By Colombia
आपली बदलत असलेली जीवनशैली आणि त्यातून निसर्गाची होत असलेली हेळसांड याने पर्यावरणाचे सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. एका नातीने आजोबांना सांगितलं,
‘आजोबा चॉकलेट खाल्लेला कागद रस्त्यावर टाकू नका, पिण्यासाठी घेतलेलं पाणी दोन घोट पिऊन बेसिनमध्ये ओतू नका. आजोबा तुम्ही इतके मोठे झालात तरी इतक्या छोट्या गोष्टी तुम्ही का नाही सांभाळत? अहो, आपण हे प्रत्येकाने नाही केलं तर स्वच्छता कशी होईल, पिण्याचं पाणी कसं पुरेल?’ नातीच्या या उद्गाराने आजोबांचं वय क्षणिक खाली आलं. कारण माणूस वयाने मोठा असला आणि आचरणाने छोटा असला तर त्याला अशा विचारांची धोबीपछाड सहन करावी लागते. आता काळ बदलत चाललाय. नातवाने आजोबाला आणि नातीने आजीला असं काही करू नको हे सांगण्याचे दिवस आपण आणले आहेत. आजचा दिवस गेला म्हणून आपण जरी खुश असलो तरी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पर्यावरणाचं रक्षण, निसर्गाचं प्रेम व्यक्त करू शकतो. आपण कधी याचा विचार करतो का? माणसाने बुद्धीच्या जिवावर प्रगती साधली पण निसर्गाची मात्र हेळसांड केली.
कितीही दुष्काळ पडला तरी रानावनात गाणारी कोकिळा बेसूर गात नाही, वाघ कितीही भुकेला असला तरी गवत खात नाही किंवा हत्ती कितीही शक्तिमान असला तरी हरणाच्या डोक्यावर पाय ठेवत नाही. या सगळ्या अबोल प्राण्यांनी निसर्गाचं चक्र अबाधित राखलं. आम्ही शहरांच्या विस्तारासाठी जंगलं तोडली, पण प्राण्यांनी त्यांच्या जीवनशैलीत कधीही बदल केला नाही. ज्यांनी या निसर्गाचं ऋतुचक्र अबाधित राखण्यासाठी आपली जीवनशैली बदलली नाही, त्यांचं स्मरण सकाळी उठल्यानंतर केल्यास आपण आपल्या सवयीदेखील निश्चित बदलू शकू. कोणताही बदल हा स्वत:पासून करायला हवा तरच त्यातून सामूहिक चळवळ, पुढे परिवर्तन आणि समृद्धी निर्माण होऊ शकते. हे सगळं शक्य आहे केवळ संकल्प आणि निश्चयाने. आपल्या प्रत्येकाने पाण्याचा थेंब आणि थेंब बचतीचा निश्चय केला तर लाखो लिटर पाणी वाचू शकतं. गरज असेल तेव्हा वीज वापरा किंवा दररोज किमान एक तास अनावश्यक विजेचा वापर टाळेन असा संकल्प केल्यास खूप काही घडू शकतं. आज आपलाच सामाजिक विश्वास ढळू लागला आहे. पण हे सहज शक्य आहे. त्याकरिता सामाजिक जबाबदारीचं भान आपलं आपण जपलं पाहिजे. आजच्या जागतिक वसुंधरा दिनी आपण पर्यावरण रक्षणाचा किमान एक तरी निश्चय करावा आणि तो अंमलात आणावा ही वर्तमानाची गरज आहे.
आपलं राष्ट्रीयत्व हे केवळ राष्ट्रीय दिनाच्या दिवशी व्यक्त करण्यापेक्षा आपला प्रत्येक दिवस हा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा असायला हवा. पूर्वीच्या काळी या गोष्टींचं भान राखलं जात होतं. म्हणून देवळापाशी पाण्याचे तलाव होते. त्यामुळे साहजिकच हे तलाव देवाच्या श्रद्धेपोटी स्वच्छ राखले जात. गावाजवळच्या देवराईंमुळे गावाच्या आजूबाजूचं जंगल संरक्षित राखलं जात असे. हे जंगल देवाचं असल्याने त्याची तोड केली जात नसे. देवाप्रती असणारी श्रद्धा आणि निसर्गाविषयी व्यक्त केली जाणारी कृतज्ञता याचा मेळ साधला जाण्याचा तो सुवर्णकाळ होता.
प्रत्येक भारतीय सण आणि परंपरेचं निसर्गाशी एक वैज्ञानिक नातं होतं. पण विकासाशी मेळ साधताना आपण निसर्गाशी अश्रद्ध भावनेने वागू लागलो. मग विकास हीच प्रगतीची खरी खूणगाठ मानत जागतिकीकरणाच्या वाटचालीत आपण पर्यावरण संतुलनाकडे दुर्लक्ष केलं आहे. आज काही प्रदेशात ५०० फूट खाली गेल्यानंतरदेखील पाण्याचे स्रोत सापडत नाहीत. याचं कारण या सगळ्या अमर्याद वापरला प्रतिबंध करायला हवा.
पर्यावरण आणि प्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण होण्यासाठी आपण केलेली निसर्गाची हेळसांड कारणीभूत आहे. आपण वेळीच याबाबत दक्ष राहिलो नाही तर येणारा भविष्यकाळ हा पर्यावरण व प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नांनी ग्रासलेला असेल. आपण सारेच जण सुजाण नागरिक आहोत असं म्हणत असू तर आपला प्रत्येक दिवस पर्यावरण रक्षणासाठी मोलाचा आहे, याचं भान ठेवू या आणि जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने भविष्यातल्या समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध होऊ या.
Copier le lien
Facebook
WhatsApp
X
E-mail