

PUBLIC DEMAND:
*मतदार याद्या आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक करा : ऑनलाईन याचिका*
राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केल्यानंतर संपूर्ण देशात निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर चर्चा सुरु झालेली आहे .
लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेला महत्वपूर्ण स्थान असल्याने केवळ "राजकीय आरोप " अशा दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने पाहून दुर्लक्ष करणे अयोग्य ठरेल .
अगदी ग्रामपंचायती पासून ते लोकसभेच्या निवडणुकीत "बोगस राखीव मतांचा आधार " घेतला जातो हे नागडे वास्तव आहे .
एकाच पत्यावर अनेक मतदारांची नोंद करून 'खास मतदार ' निर्माण करणे , एकाच व्यक्तीचे मूळ निवासी आणि नोकरी -व्यवसायाच्या ठिकाणी मतदान नोंदणी करणे , नाव एकाचे ओळखपत्र दुसऱ्याचे असे प्रकार सर्रास होताना दिसतात . मतदार याद्या या सदोष आहेत हे कटू वास्तव नाकारता येणार नाही .
*दोषरहित मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा आत्मा आहे* .
मतदान प्रक्रिया हि अत्यंत पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे हि लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे .
Main demand:
*निवडणूक आयोगाने आपल्या विश्वासार्हतेचे जतन संवर्धन करण्यासाठी डिजिटल इंडिया यात उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र बाद करून आधार बेस्ड डिजिटल ओळखीच्या सहाय्याने मतदान प्रक्रिया सुरु करावी* .
याच विषयाच्या अनुषंगाने CHANGE.ORG वर याचिका दाखल केलेली आहे .
मतदारांचा आवाज निवडणूक आयोगापर्यंत पोचवण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करून या पेटिशनवर साइन करत नक्की समर्थन द्या .
LINK FOR PETITION :
https://chng.it/5m8nw9JW5z
With High Regards
SAJAG NAGRIK MANCH NAVI MUMBAI [ सजग नागरिक मंच , नवी मुंबई ]BE THE CHANGE YOU WANT TO BE
Dream It ! Belive It ! Make it happen!
ALERT CITIZENS ARE THE MAIN PILLAR OF DEMOCRACY
mail for contact:-alertcitizensforumnm@gmail.com